Skip to contentdesh bhakti geet
desh bhakti geet । देश भक्ती गीत
desh bhakti geet Lyrics:
आता उठवू सारे रान
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण ।।धृ।।
किसान मजूर उठतील, कंबर कसण्या लढतील
एकजुटीची मशाल घेऊन, पेटवतील हे रान ।।१।।
कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची, उठवू दाणादाण ।।२।।
शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती गाती, स्वातंत्र्याचे गान ।। ३ ।।
पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी, कामकरी, मांडणार हो ठाण ।।४।।
– साने गुरुजी
शूर आम्ही सरदार
शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भिती
देव देश अन् धर्मापायी, प्राण घेतलं हाती ।।धृ।।
आईच्या गर्भात उमगली, झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं, जडली येडी प्रीत
लाख संकटे झेलून घेईल, अशी पहाडी छाती ।। १ ।।
जिंकावं वा लढून मरावं, हेच आम्हाला ठावं
लढून मरावं, मरून जगावं, हेच आम्हाला ठावं
देशापायी सारी विसरू, माया ममता नाती ।।२।।
– शांता शेळके
उठा राष्ट्रवीर हो
उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला,
सशस्त्र व्हा उठा चला, उठा राष्ट्रवीर हो ।।धृ।।
युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळूनी सर्व शत्रूला, क्षणात चारू या खडे
एक संघ होऊनी लढू चला लढू चला
उठा, चला, उठा राष्ट्रवीर हो ।।१ ।।
वायुपूत्र होऊनी, धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊया समर्थ होऊ या चला
उठा, चला, उठा राष्ट्रवीर हो ।।२ ।।
चंद्रगुप्त वीर तो, फिरुनी आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसात साठवू
हिंदवी परंपरा, अखंड चालवू चला
उठा, चला, उठा राष्ट्रवीर हो ।।३ ।।
उष:काल होता होता
उष:काल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ।।धृ।।
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ।।१ ।।
तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्गसाती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेत ही न वाली ।।२ ।।
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली ।। ३ ।।
धुमसतात अजुनी इथल्या चितांचे निखारे
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आंसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ।।४।।
-सुरेश भट
अजिंक्य भारत अजिंक्य जनता
अजिंक्य भारत, अजिंक्य जनता, ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे, उंच धरा रे ।। धृ ।।
मातीमधल्या कणाकणातून, स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले, संघटनेचा मंत्र जपा रे ॥१॥
भाग्यवान ते जवान सगळे, हसत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तब मरण जिंकले, मान राखला मातृभूमीचा रे ।।२।।
इतिहासाच्या पानोपानी, बलिदानाची घुमती गाणी
धन दौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाऊया रे ।। ३ ।।
वेडात मराठे वीर दौडले सात
म्यानातून उसळे तलवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात ।।धृ।।
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले,
सरदार सहा सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय झेलले भाले,
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात ।।१ ।।
आश्चर्य मुग्ध टाकुनी मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्जुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात ।।२।।
खालून आग वर आग आग बाजूनी
समशेर उसळली सहस्त्र क्रूर ईमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात ।।३।।
दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा
क्षितीजावर उठतो अजुनी मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वाऱ्यागात ।।४।।
– वि.वा. शिरवाडकर
हा देश माझा…
हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे
जरासे राहू द्या रे ।।धृ।।
हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
या गंगा-यमुना, शेती-धरती, बाग-बगिचा माझा
अभिलाषा याची धरीता, कुणी नजर वाकडी करता
त्या मरण दयावया, स्फुरण आपुले बाहु पाहू द्या रे
हा देश माझा…२ वेळा ।।१ ।।
हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला
रोखा ते लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ काहीसा अर्थ ही येऊ द्या रे
हा देश माझा… २ वेळा ॥२॥
जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती
परि अभंग असू द्या, सदैव आपुली, माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंका रे एक तुतारी
संदेश शेष जे, द्वेष मनातील, वाहून जाऊ द्या रे
हा देश माझा… २ वेळा ।।३।।
– सेनापती बापट
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू
माणुसकीच्या शत्रूसंगे, युध्द आमुचे सुरु ।।धृ ।।
लढती सैनिक लढू नागरिक, लढतील महिला, लढतील बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू ।।१ ।।
देश आमुचा शिवरायांचा, झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू ।।२ ।।
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भूई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू ।।३ ।।
हानी होवो कितीही भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू ।।४।।
– ग. दि. माडगूळकर
१५ ऑगस्ट दिन गीत
(चाल – वेड्या बहिणीची वेडी रे माया)
सोनियाचा दिवस, आज उगवला – २
१५ ऑगस्ट नाव त्याला हो SS
चला जाऊ झेंडावंदनाला – २ ।।धृ।।
पूज्य बापूजींनी, तपश्चर्या केली – २
मातेच्या कृपेने, पार पाडली ऽऽ
२ सत्य याचा विजय, याच दिवशी झाला २ ॥१॥
इंग्रजांनी देशावर, अन्याय केला – २
चलेजाव बापूजींनी, घोषणा केल्या – २
अन्यायाच्यासाठी, भारत उभा पाठी – २ ॥२॥
याच दिवशी देश आमुचा स्वतंत्र झाला – २
इंग्रजांनी देशातून पळ काढला SS – २
देशाचा तिरंगा, आज फडकला – २ ।।३।।
जयोस्तुते ऽऽ जयोस्तुते
जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामह्म, यशोयुताम वंदे ।।धृ।।
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदांची
स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची, आकाशी होशी
स्वंतत्रते भगवती चांदणी, चमचम लखलखशी
वंदे त्वामह्म यशोयुताम् वंदे । जयोस्तुते ….।।१ ।।
गालावरच्या कुसुमी किंवा, कुसुमांच्या गाली
स्वंतत्रते भगवती तूच ती, विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज उद्धिचे, गांभिर्यही तूची
स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची
वंदे त्वामह्म यशोयुता वंदे । जयोस्तुते ।।२।।
मोक्षमुती ही तुझीच रुपे, तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती योगीजन, परब्रह्म वदती
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते.
बंदे त्वामह्म यशोयुताम् बंदे ।।३ ।।
हे अधम रक्तरंजिते, सुजन पूजिते
श्री स्वतंत्रते 5 श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते
तुजसाठी मरण ते जनन, मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण, जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण
श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते ।।४।।
–स्वातंत्र्यवीर सावरकर
बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो ।।धृ।।
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिदध मरायाला हो ।।१।।
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमिर घोर संहारिन, या बंधू सहाय्याला हो ।॥२॥
हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंच जपून, या कार्य करायला हो ।।३ ।।
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदाला हो ।।४।।
या उठा (२) करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो ।।५।।
ही माय थोर होईल, वैभवी दिव्य शोभेल
जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो ।।६ ।।
– साने गुरुजी
हे सकल जणांच्या देशा
हे सकल जनांच्या देशा, हे हृदयांच्या परमेशा ।॥धृ॥
हा तुझा तिरंगी झेंडा गर्वाने गगनी उभवू
अन् गर्जत दाही दिशांना जयघोष तुझा हा घुमऊ ।।१।।
तू सत्याचा रखवाला तू न्यायाचा कैवारी
तू शांतीचा सांगाती तू समतेचा ललकारी ॥२ ।।
तू धर्म सर्व धर्माचा, तूज समोर कसल्या जाती
तू एकच आमुची भाषा, तुज समोर कुठली नाती ।।३।।
तू सार्थक आयुष्याचे सर्वस्व आम्ही तूज वाहू
खांद्याला लावून खांदा तूज संगे चालत राहू ।।४।।
– सुरेश भट
हे राष्ट्र देवतांचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषिताचे
आ चंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।धृ।।
कर्तव्यदक्ष भूमी, सीता रघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वतांचे ।।१ ।।
येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला, येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला, गीताख्य अमृताचे ।।२।।
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनतळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो, जयगीत जागृतीचे ।।३।।
येथेच मेळ झाला सामर्थ्य संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवान तथागताचे ।।४।।
हे राष्ट्र विक्रमांचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज घ्यावी, या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी, नरसिंह योग्यतेचे ।।५।।
माणूस माझे नाव
माणूस माझे, माणूस माझे, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढेच माझी धाव ।।धृ।।
बिंदू मात्र मी क्षुद्र खरोखर
परि जिंकले सातही सागर
उंच गाठला गौरी शंकर-माणूस माझे नाव
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव ।।१ ।।
मीच इथे ओसाडीवरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती,
कणकण ही जागवली माती-माणूस माझे नाव
दुर्भिक्षाच्या छाताडावर हसत घातला घाव ।।२।।
ही शेते अन् ही सुख सदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवीत नवे तराणे-माणूस माझे नाव
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव ।।३।।
सुखेच माझी मला बोचली
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितीजे सदा खुणवीती – माणूस माझे नाव
दूर दाट निबीडात मांडला पुन्हा नवा मी डाव ।।४।।
– बाबा आमटे