Charolya: चारोळ्या म्हणजे चार ओळींची यमकबध्द अशी वाक्यरचना. भाषेच्या प्रभावासाठी जसे अलंकारिक शब्द, उदाहरणे दाखले, वाक्यप्रचार म्हणी, संत ओव्या, भाषा उच्चार स्पष्टता, आवाज चढ-उत्तार, शब्द शुध्दता या बाबी आवश्यक असतात. परंतु चारोळ्या भाषणाची व निवेदनाची छाप टाकते परंतु चारोळ्यांचा वापर कसा करावा हे माहित असणं महत्वपूर्ण ठरते.
चारोळ्यांचा वापर कसा करावा?
- प्रथम कार्यक्रम कोणता यानुसार चारोळी निवड करावी.
- चारोळ्या व वत्कृत्व विषय यांची सांगड पहावी.
- चारोळी कथन योग्य असावे.
- चारोळी स्पष्टीकरण गती योग्य हवी.
- चारोळी केव्हा वापरावी याचा अचूक वेध घ्यावा.
- चारोळी सांगताना योग्य भाषा शैलीचा वापर करावा.
- चारोळ्यामधील सलगता शक्यतो टाळावी.
- कम राबविताना पस्तक संदर्भ म्हणून वापरावे)
- चारोळी क्रम योग्य हवा.
मराठी चारोळ्या
Marathi Charolya । Marathi Charoli
पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी चारोळी (Charoli)
करण्यास स्वागत सुर्य नारायणाचे
सज्ज ही आकाश पृथ्वी शुक्र तारका
करण्यास स्वागत वरुणांचे
सज्ज ही मधुर, फुले, फळे, पक्षिका
करण्यास स्वागत पाहुण्यांचे सज्ज ही… संस्था/शाळा
निवड अध्यक्षाची चारोळी
फुला विना सुगंध नाही
सुर्या विना किरण नाही
सुर ताला विना संगीत नाही
पाण्या विना जीवन नाही
अध्यक्षा विना कार्यक्रमाला मनमोहकता नाही
विचार मांडण्यासाठी येत असताना चारोळी
वेड जीवास लागले
गर्जना ही शब्दच्छलांनी
मन धाव घेत आहे
सरस्वतीच्या चरणी
नशा मनरूपी विचार मांडण्यासाठी येत आहेत………
अध्यक्षांच्या भाषणासाठी चारोळी
व्याकरणाविना नाही महत्व मराठीला
पोपटाविना नाही महत्व पिंजऱ्याला
हृदयाविना नाही महत्व शरीराला
अध्यक्षांच्या भाषणाशिवाय नाही महत्व कार्यक्रमाला.
सत्कारासाठी चारोळी
वसंताविना सृष्टीला बहर तो कसला
फुलाविना बागेला फुलारा ती कसला
ठगांविना आकाशाला आधार तो कसला
सत्काराविना कार्यक्रमाला उजाळा ती कसला
अध्यक्ष निवडीसाठी चारोळी
राजाविना दरबार तो कसला ?
सिंहाविना जंगलाचा राजा ती कसला ?
अध्यक्षाविना सोहळ्याचा साज तो कसला ?
प्रस्तावनेसाठी / प्रास्ताविकासाठी चारोळी
वसंत ऋतु येणार आहे
समजते कोकिळेच्या गायनातून
मेघातून वर्षाव होणार आहे
समजते विजांच्या नृत्यातून
आपण कशासाठी जमलो आहोत
समजते कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून
आभार प्रर्दशनासाठी चारोळी
एक बाती एक ज्योती
दोन वाती एक पणती
सांगता करूया कार्यक्रमाची
भाषण झाल्यानंतर चारोळी
स्वरांची गुंफन दिसते गाण्यावरून
कलेची गुंफन दिसते चिन्नातून
भावनांची गुंफन दिसते नृत्यातून
विचारांची गुंफन दिसते भाषणातून
ज्यांनी रक्ताने लिहली बलिदानाची गाथा
घनघोर तिमिर असताना जे ज्योत होऊनी जळले
सोडिले घरदार ज्यांनी तोडिले पाश मायेचे
त्या अनंत वीरांना त्यांच्या स्त्रीरत्नाप्रमाणे
असणाऱ्या मातांना आमचा विनम्र माथा । विनम्र माथा ।
चारोळी
नाश करणाऱ्या त्या विजांची शपथ
उदारपणे रक्त वाहणाऱ्यांची शपथ
गौरवशाली अभिमानाने फडफडणाऱ्या झेंड्याची शपथ
देश रक्षणाची आमची शपथ आमची शपथ
संताची चारोळी
डोंगरांची भूमी ओठ्यांची भूमी
शेतीची भूमी मनोऱ्यांची भूमी
कष्टकऱ्यांची भूमी जमीन आहे ही थोर पुन्नांची
बलिदानाची गाथा सदा राखणारी ही
महाराष्ट्राच्या संताची भूमी
चारोळी
निर्सगाला रंग हवा असतो
फुलाला गंध हवा असती
माणूस तरी एकटा कसा राहू शकतो
त्यालाही कोणाच्या तरी प्रेमाचा
स्वप्नांचा आधार हवा असतो
शेतकरी व्यथा चारोळी
आज आभळ फाटलं
श्वास उरात गोठलं
घर शेतामध्ये पाणी
आणि गोठ्यामध्ये साठल
दुःख सांगू रे कोणाला पाणी डोळ्यांत आटलं,
पाणी डोळ्यांत आटलं
चारोळी
आम्ही जन्मलो मातीत
किती होणार गा माती
खापराच्या दिव्यामध्ये कधी पेटणार वाती
गाडगेबाबा चारोळी
सोडूनी सर्व घरदार सोडीले पाश मायेचे
अनवाणी फिरून पायी
अश्रू पुसले बहुजनांचे
हाती घेऊनी खराटा अवघ्या झाडील्यारे वाटा
चारोळी
जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा
चारोळी
निज देहाचे झिजवूनी चंदन
इथे वेचिले तुम्ही कंकण
आणि फुलविले हसरे नंदन
स्मृतीस तुमच्या शतशःवंदन
शतशः वंदन।
चारोळी
रंगारंगाच्या लढाईत पक्षीय नेते दंग आहेत
झोपडीतील चिमुरडी बबी
भाकरीसाठी आज ही रडत आहे
आज ही रडत आहे.
चारोळी
भारत माझा महान फार
कुणी राहिला नाही आचार
कुणा राहिला नाही विचार
कुठे तरी आहे शिष्टाचार
बाकी सारा भष्ट्राचार
चारोळी
सुख हे फुलपाखरांसारखं असतं
पाठलाग कराल तर उडून जात
बळजबरीने पकडाल तर मरून जात
निरपेक्ष काम करत रहाल तर ते
अलगद येवून तुमच्या हातावर विसावंत
चारोळी
निवडणूक जवळ येताच
त्यांना फुटती पान्हा
निवडून गेल्यावर मान्न
पाच वर्षांनीच भेटतात पुन्हा
चारोळी
जिंदगी मिली है तो हँसते हँसते गुजारी
कभी भी साथ चाहिए तो
हम को कहीं से भी पुकारी
चारोळी
शब्द नको निरोपाचे कर स्वागत उगवतीचे
पाहता पाहता वर्ष संपले
कडू गोड आठवणीचे
कडू गोड आठवणींचे
चारोळी
लाटांचा विचार करणारी नाव
कधी किनारा गाठणार नाही
यशासाठी प्रयत्न करणारी माणसे
कधी अपयशाला भिणार नाहीत
चारोळी
कुणाचे अश्नु सुखाचे असतात
कुणाचे अश्नु दुःखाचे असतात
पण माझे अश्नु असे असतात की
जे चेहऱ्यावर हसतात पण हृदयातून रडत असतात
पती-पत्नीसाठी चारोळी । Charoli For Husand-Wife
तुझ्या कुंकंवाशी माझ नात
जन्मी जन्मीच असावं घालताना गळ्यात मंगळसून्न
तू डोळ्यात पाहून हसावं
किती ही संकटे आले तरी तुझा हात माझ्या हातात असावा आणि
मृत्युला जवळ करतानाही माझा देह तुझ्या मिठीत असावा
पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायच असतं
आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं
जीवन फक्त जगायचं असतं का म्हणून विचारायच नसतं
चारोळी
हवीहवीशी वाटणारी माणसं
जेव्हा हे जग सोडून जातात
नकोनकोशी वाटणारी आसवं
तेव्हा आपोआपच वाहतात
चारोळी
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते
आनंद दाखवण्यास हसण्याची गरज नसते
दुःख दाखविण्यास अश्रुंची गरज नसते
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते ती म्हणजे मैन्नी
चारोळी
जिंदगी में कुछ सपने सजा लेना
वक्त मिले तो कुछ अरमान जगा लेना
हम आपकी राहों से हर दर्द चुरा लेंगे
बस आप यूं ही हमसे फ्रेंडशिप बनाये रखना
चारोळी
तुटलेली काच, तुटलेली मने
जोडणं अवघड काम आहे
कसही जोडल तरी एका
रेघेच अस्तित्व कायम आहे
चारोळी
चांदण्या आवडतात म्हणून अंधाराचा
तिरस्कार करून चालत नाही
कारण अंधाराशिवाय
चांदण्या असूच शकत नाहीत
चारोळी
आयुष्याच्या जमाखर्चात एवढं गुंतून
जायचं नसतं जीवघेण्या आठवणीसाठी
एवढं वेड व्हायचं नसतं
चारोळी
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हाही
क्षितिजा पलिकडे यशाची गरुड झेप
घेण्याची मनी जिद्द असावी
चारोळी
काटा जरी काट्या सारखा वागला तरी फुलाने
आपलं फुलणं सोडायचं नसतं
जीवन किती ही खडतर असलं
तरी ही माणसांन आपलं जगणं सोडायंच नसतं
चारोळी
माणसं माणसांना विसरतात तेव्हा
आत्माच निघून जातो
आयुष्याच्या वळणावरचा
ऋणानुबंधाचा धागाच तुटून जातो
चारोळी
चालण्यासाठी बाट असते
वाटेसाठी चालणं नसंत
उंच भरारी घेणाऱ्याला
आभाळांच ओझं नसतं
चारोळी
काही नाती तुटत नसतात
ती आपोआपच नकळत मिटून जातात
जशी बीटावर रंग ठेवून
फुलपाखरू दुर उडून जातात
चारोळी
जीवन संघर्षात असंच फुलत रहा
व्यथा कधी बोचलीच तर
नवी क्षितिचे पहा
चारोळी
रडणं म्हणजे जीवन आहे
जगताना थोड हसंत जग
एक डाव मोडला तरी दुसरा डाव
मांडून तर बघ
चारोळी
जीवन किती सुंदर आहे
अनुभव तुला देत जाईन
प्रयत्न करायला विसरू नको
मार्ग तुला सापडत जाईल
चारोळी
थवा पाखरांचा दुर उडून जातो
मनात आठवणींचा ओलावा
का बरं ठेवून जातो ?
चारोळी
एवढ्या आयुष्यात खूप काही
हवं असतं
पण हंव ते मिळत नसतं
हवं ते मिळालच तरी खूप काही
कमी असतं
चांदण्यांनी भरून सुध्दा आभाळंही
रिकामंच असतं
चारोळी
जीवन संघर्षात खूप काही करायंच असतं
आपलं वेगळपण नक्कीच दाखवायचं असतं
हरून सुध्दा पुन्हा एकदा जिंकायच असतं
हार जीत जीवनाचंच नाव असतं
चारोळी
पुसणार कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कुणाचे डोळेच भरणार नसतील तर
मरण सुध्दा व्यर्थ आहे
चारोळी
फुल उमलताच क्षणी जसा त्यातून
सुगंध दरवळत रहावा
असाच आठवणींचा स्मृतीगंध सतत
हृदयाच्या आतल्या कप्प्यात कायम दरवळत राहिलच
चारोळी
जीवन एक उद्यान आहे
ते खुप कष्टांन फुलवायचं असतं
आशेची फुलं सुकली तरी ही
कधी खचायचं नसतं
चारोळी
सुर्यप्रकाश संपला तरी
संधीप्रकाश रेंगाळत असतो
सहवास संपला तरी
आठवणींचा सुगंध मात्र
सर्वन्न दरवळत असतो
चारोळी
जगण्यात अर्थ नसतो
तेव्हा ही आपण जगत असतो
स्वप्नातील दिवस आपण
वास्तव विसरून पाहात असतो
चारोळी
माणसांची दुःख माणसांना कधीच
कळत नाहीत
कारण माणस कधीच
माणसासाठी पूरत नाहीत.
चारोळी
दुसऱ्यांना हसविणारा
मात्र स्वतः रडत असतो
दुसऱ्यांना कसे इसबिले हेच
मान्न तो विचारत असतो
चारोळी
दाटून आलेल्या सायंकाळी
अवचित सोनेरी ऊन पडंत
असचं काहीसं चोर पावलांनी
जीवनात आपल्या यश येत असत
चारोळी
वाटा भरधाव पळत असतात
जागोजागी वळत असतात
पण एक जरी अंदाज चुकला
की बऱ्याच सुवर्ण संधी जात असतात
चारोळी
माणसांन नेहमी
गुलमोहरासारख असावं
जिथे सारी फुले कोमजतात
त्या उन्हांतही फुलावं
चारोळी
बेकारीच्या युगात
स्पर्धेलाच वाव आहे
माणसांपेक्षा इथे जनावरांनाच
भाव आहे
चारोळी
खरंच शिक्षणाने मुलांवर संस्कार होतात
बेकारीने त्यांच्या पदव्यावर
अंत्यसंस्कारच का बरं होतात ?
चारोळी
हसून पहाव रडून पहांव
जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं
काहीतरी द्याव काही तरी घ्याव
आपण गेल्यावर आपल
कुणीतरी नाव नक्कीच काठाव
चारोळी
झाडावरून प्राजक्त ओघळतो
त्याचा आवाज होत नाही
याचा अर्थ असा नाही
की त्याला इजा होत नाही
चारोळी
यश खिशात टाकणाऱ्याला
यशात यश मिळत जात
यशाच्या नजरेत मिरवणाऱ्याला
यश का बर सोडूनच जात ?
चारोळी
कधी कधी मनावर आठवणींच्या
पाकळ्या पसरतात
डोळ्यातून गालावर
नकळत अश्रूचे थेंब ओघळतात
चारोळी
स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात
स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते
यशस्वी व्हायला कष्टाचे परिश्रमाचे प्रयत्न लागतात
जग जिंकायला देवाचे ही आर्शिवाद लागतात